Wednesday, 7 January 2009

पलायन

वेगानं निघून जाताना निदान वळून तरी
बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते
सर्प झाडावर चढला की
पक्षी, पीले सोडून निघून जातात
पण, आज ना उद्या हे सगळे बदलणार होते
गावात आक्रोशाचा भड़का उडणारच होता.......
माणसांनी असे ऐनवेळी पलायन करू नये
वस्ती जळायला लागली की, पळून जाऊ नये.....

- लोकनाथ यशवंत
(आता होऊन जाऊ द्या!)

No comments: